चीनकडून साडेपाच हजार कोटी घेणे हा शहिदांचा अपमान

Share this Newz

नवी दिल्ली : चीनने एप्रिल २०१६ ते मार्च २०२० दरम्यान भारतामधील १६०० हून अधिक कंपन्यांमध्ये एक अब्ज डॉलर्सची थेट परदेशी गुंतवणूक (एफडीआय) केली आहे. सरकारनेच जारी केलेल्या आकडेवारीमधून ही माहिती समोर आली आहे. राज्यसभेमध्ये एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना सरकारने ही माहिती दिली आहे.

यावरून आता एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी सरकारला धारेवर धरले आहे.

१५ जून रोजी चिनी सैनिकांबरोबर झालेल्या चकमकीत आपले २० जवान शहीद झाले. ते अत्यंत निर्दयी होते. त्याच्या चार दिवसांनंतर १ जून रोजी चीनकडून ५ हजार ५२१ कोटी रूपये घेतले. आपल्या जवानांच्या बलिदानाचा हा अपमान आहे, असे ओवैसी म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला.

भारतीय कंपन्यांमध्ये त्यातही स्टार्टअप कंपन्यांमध्ये चीनकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे, हा दावा खरा आहे का, असा प्रश्न सरकारला विचारण्यात आला होता. या प्रश्नाला सरकारकडून देण्यात आलेल्या लेखी उत्तरामध्ये भारतातील १६०० हून अधिक कंपन्यांमध्ये चिनी गुंतवणूक आहे. एप्रिल २०१६ पासून मार्च २०२० पर्यंत चीनने भारतीय कंपन्यांमध्ये १.०२ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक एफडीआयच्या माध्यमातून करण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे.

चीनने गुंतवणूक केलेल्या या १६०० कंपन्या ४६ वेगवेगळ्या क्षेत्रांमधील आहेत. यामध्ये वाहन उद्योग, पुस्तक छपाई, इलेक्ट्रॉनिक्स, सेवा आणि वीज उपकरणांच्या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांना चीनमधून १० कोटी डॉलरपेक्षा अधिक निधी एफडीआयच्या माध्यमातून मिळाला आहे.

चीनकडून सर्वाधिक गुंतवणूक ही वाहन उद्योगक्षेत्रात करण्यात आली आहे. मिळाली आहे. वाहन उद्योगाच्या माध्यमातून मागील चार वर्षात चीनने भारतात १७.२ कोटी डॉलरची गुंतवणूक केली आहे. तर सेवा देणाऱ्या क्षेत्रामध्ये (सर्व्हिसेस) चीनने १३ कोटी ९६ लाख ५० हजार डॉलरची गुंतवणूक केली आहे.


Share this Newz