नवी दिल्ली : ऍमवे इंडियाने जागतिक ए70 बहु-वार्षिक विकास रणनीतीची आखली आहे, जिने सामाजिक व्यापारासह उद्यमशीलतेच्या सामर्थ्यास बढावा देण्यावर भर दिला आहे. या बहु-वार्षिक विकास रणनीतीचा भाग म्हणून ऍमवे इंडियाने एक प्रमुख जागतिक मेगाट्रेंडच्या रुपात अफाट अर्थव्यवस्थेची वाढ ओळखली आहे. या अनुरूप आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या पुनरुत्थानास पाठींबा देण्याच्या प्रयत्नात, ऍमवे इंडियाने तिचे थेट किरकोळ विक्रेते/विक्रेते यांची वाढ होण्यावर आणि त्यांच्या फायदेशीर, स्थायी यशाकरिता व्यवसाय निर्मितीची नवीन माध्यमे तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
ऍमवे इंडियाचे सीइओ, अंशू बुधराजा म्हणतात की, “सध्या भारताची लोकसंख्या ही 35 वर्षांखालील लोकसंख्या 65% असणारी जगातील सर्वात तरुण लोकसंख्या आहे. अलीकडील ऍसोचेम अहवालानुसार, भारताची अर्थव्यवस्था 17% सीएजीआर पर्यंत वाढणे अपेक्षित आहे आणि असे झाल्यास 2023 पर्यंत भारताच्या अर्थव्यवस्थेत 55 अब्ज डॉलर्स इतकी अवाढव्य वाढ होऊ शकते. रोजगार बाजारात विवर्तनीय बदल होत असल्याने, ऍमवे इंडियाने यु-35 पासून तिच्या व्यवसाय मॉडेलच्या व्याजात प्रचंड प्रमाणात वाढ झालेली पहिली आहे, जी सध्याची विचित्र परिस्थिती पाहता अर्थव्यवस्थेच्या इकोसिस्टीममध्ये लवचिक भूमिका स्वीकारू शकेल. आज आम्हाला फक्त दुसऱ्या तिमाहीत व्यवसायाच्या संधी शोधणाऱ्या लोकांमध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसत आहे, ज्यापैकी यु-35 श्रेणी अंतर्गत 64% नवीन नोंदी आहेत, जी आमच्या उत्पादनांची रेंज आणि व्यवसाय संधींप्रती एक मजबूत आत्मीयता दर्शवित आहे. याशिवाय, सध्या ऍम्वेचे 53% ग्राहक हे यु35 श्रेणी अंतर्गत येतात जे आमची उच्च प्रतीची उत्पादने घेण्यास उत्सुक आहेत. आम्ही आमच्या थेट किरकोळ विक्रेत्यांना उपक्रम कौशल्यातील सातत्याच्या आणि जागतिक दर्जाच्या उत्पादनांच्या माध्यमातून त्यांच्या व्यवसायात वाढ होण्यासाठी आणि यश मिळवून देण्यासाठी मदत करण्यास कटिबद्ध आहोत.
डेलॉईटच्या ‘फ्युचर ऑफ वर्क ऍक्सेलरेटेड’ अहवालानुसार पाच पैकी तीन संस्था (60%) या पूर्णवेळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरील अवलंबन कमी करून सूक्ष्म उद्योजकांचा वाटा वाढवत आहेत. एफएमसीजी उद्योग हे आज भारतातील मोठ्या गतिमान क्षेत्रांपैकी एक आहे, जी सूक्षम उद्योजकांच्या वाढीस चालना देत आहे. ऍमवेमध्ये उद्योग क्षेत्रातील इतर कंपन्यांच्या तुलनेत अधिक भागीदारी आणि योग्यता पाहिली गेली आहे, जसे ती ज्यावर लोक विश्वास करू शकतील अशी उत्तम प्रतिष्ठा, दर्जेदार उत्पादने व सेवा पुरवते, उद्योन्मुख ट्रेंडच्या अनुरूप त्यांची आवड आणि समाजाची जान जोपासणाऱ्या संधी पुरवते.
याशिवाय, भारत सरकारच्या कौशल्य भारत उपक्रमासह, ऍमवे इंडियाने थेट विक्रेत्यांना त्यांच्या व्यवसाय वाढीत मदत होण्यासाठी त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होण्यासाठी आणि उत्तम बाजारपेठ प्रवेश धोरणात, संभाव्य ग्राहकांपर्यंत पोचण्याच्या क्षमतेत, उत्पादन प्रवेशामध्ये वाढ होण्यासाठी आणि ग्राहकांच्या अनुभवात वाढ होण्यास मदत करण्यासाठी डिजिटल-फर्स्ट दुर्ष्टीकोनावर लक्ष केंद्रित केले आहे. याशिवाय, ऍमवे इंडियाने 6000 प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले आहेत ज्यामध्ये लॉकडाऊनपासून 900,000 थेट विक्रेते गुंतलेले आहेत. नुकतेच लॉंच झालेले डिजिटल टूल्स, जसे ऍमवे बिझिनेस ऍप, चॅटबोट ‘मायरा’ आणि त्यांच्या इ-कॉमर्स प्लॅटफॉर्ममधील सुधारणांमुळे थेट विक्रेत्यांसाठी डिजिटल रुपांतरण सुलभ झाले आहे.
ऍमवे इंडियाच्या वरिष्ठ उपाध्यक्ष अचिंता बॅनर्जी म्हणतात, ऐतिहासिकदृष्ट्या पाहता थेट विक्री ही आर्थिक वाढीस खतपाणी घालण्यात महत्वाची भूमिका बजावते आणि ज्यांना घरबसल्या उत्पन्न हवे आहे त्यांच्यासाठी पर्यायी आणि पारंपरिक रोजगार प्रदान करते. आज, जेथे पारंपरिक रोजगार क्षेत्रात अडथळा येत असल्याचे पाहण्यात येत आहे, तेथे अर्थव्यवस्थेत विरोधाभासी कल दिसून येत आहे. ही वाढ संस्थेच्या अद्वितीय व्यवसाय मॉडेलमुळे झाली आहे, जे मॉडेल सदस्यांना स्वतःचा व्यवसाय करण्यास व तो चालविण्यास आणि मार्गदर्शक उद्यमशीलतेच्या माध्यमातून उत्पन्नाचे स्थायी माध्यम मिळविण्यास प्रोत्साहन देते.










Leave a Review