मुंबई : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीनंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विरोधी पक्षांनी ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे, तर मराठा संघटनांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मराठा आरक्षणाच्या विषयावर सरकारची सविस्तर भूमिका मांडत मराठा समाजाला संयम राखण्याचे आवाहन केले.
मराठा आरक्षणाचा निर्णय हा सर्व राजकीय पक्षांनी एकमताने घेतला आहे. समाजाच्या लढ्याला न्याय देण्याचा निर्णय घेतला. उच्च न्यायालयातील लढाई आपण जिंकलो. सर्वोच्च न्यायालयात आज लढाई सुरू आहे. आधीच्या सरकारने नेमलेले वकीलच मराठा आरक्षणाची लढाई लढताहेत. उलट विविध संघटनांच्या सूचनेनुसार आपण आणखी वकील दिले आहेत. आपण न्यायालयीन लढाईत कुठेही कमी पडलेलो नाही, असा दावा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केला.
‘कोणीही गैरसमज पसरवू नका. कारण गैरसमज पसरवण्यासारखे यात काहीही नाही. जे काही आहे ते स्पष्ट आहे,’ असेही मुख्यमंत्री म्हणाले.











Leave a Review