नवी दिल्ली : जागतिक खेळणी उद्योग सात लाख कोटींपेक्षाही जास्त उलाढाल असलेला उद्योग आहे. परंतु भारताचा हिस्सा त्यामध्ये कमी आहे. ज्या देशाकडे एवढी परंपरा आहे, विविधता आहे, युवा शक्ती आहे. त्यामुळे भारताला खेळणी उद्योगातील प्रमुख ठिकाण बनवण्यासाठी सर्वांनी एकत्र येत प्रयत्न करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’च्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खेळणी उद्योगावर भाष्य करत भारताला खेळणी उद्योगातील प्रमुख ठिकाण बनवण्यासाठी सर्वांनी एकत्र येत प्रयत्न करण्याचे आवाहन केले. करोनाच्या या कठीण काळात घरात राहणाऱ्या माझ्या बाल मित्र-मैत्रिणींचा वेळ कसा जात असेल? यातूनच गांधीनगरच्या चिल्ड्रन युनिर्व्हसिटी जी जगातील एक आगळावेगळा प्रयोग करत आहे.
पंतप्रधान मोदी यांनी गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांच्या एका विधानाचा दाखला देत सांगितले, की रविंद्रनाथ टागोर म्हणाले होते, उत्कृष्ट खेळणी ती असते, जी अपूर्ण असते आणि मुलं खेळत खेळत तिला पूर्ण करतात. खेळणी अशी असावी जी मुलांच्या कार्यक्षमतेला प्रोत्साहन देतील. मुलांच्या जीवनातील विविध पैलुंवर खेळण्यांचा जो प्रभाव आहे. यावर राष्ट्रीय शिक्षा धोरणातही अतिशय लक्ष देण्यात आले आहे. खेळता खेळता शिकणे, खेळणी बनवणे, ज्या ठिकाणी खेळणी तयार केली जाते, त्या ठिकाणी भेट देणे. या सर्वांना अभ्यासक्रमाचा भाग बनवण्यात आले आहे. आपल्या देशात स्थानिक खेळण्यांची मोठी समृद्ध परंपरा आहे. अनेक प्रतिभाशाली आणि कुशल कारागीर आहेत. जे चांगली खेळणी बनवण्यात अतिशय कुशल आहेत. भारताममधील काही भाग खेळणी निर्मितीचे केंद्र म्हणून विकसीत होत आहेत. जसे कर्नाटकमधील रामनगरम येथे चन्नापटना, आंध्र प्रदेशच्या कृष्णामध्ये कोंडापल्ली, तामिळनाडूतील तंजौर, आसामधील धुबरी व उत्तर प्रदेशमधील वाराणसी अशी अनेक ठिकाणं असल्याचे मोदींनी सांगितले.
असे असताना खेळण्यांच्या बाजारपेठेत त्या देशाचा वाटा इतका कमी असणे चांगले नाही. खेळण्यांचा उद्योग अतिशय व्यापक आहे. गृहउद्योग, छोटे व लघु उद्योग असतील, मोठे व खासगी उद्योग असतील याच्याच क्षेत्रात येतात. या सर्वांना पुढे नेण्यासाठी देशाला एकत्रितपणे कष्ट करावे लागणार आहे. आता सर्वांसाठी लोकल खेळण्यांसाठी व्होकल होण्याची वेळ आली आहे.









Leave a Review