मुंबई :
- माेरटाेरियमला मुदतवाढ नाही, मात्र अार्थिक संकटात दिलासा
रिझर्व्ह बँकेने गुरुवारी पतधोरणाच्या आढाव्यात व्याजदरात कोणताही बदल केला नाही. मात्र, दिलासा देणारे दोन निर्णय जाहीर केले. यानुसार, किरकोळ कर्जाची पुनर्रचना करण्यास मंजुरी दिली असून आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्यांना त्यांचे गृह, वाहन, वैयक्तिक व शैक्षणिकसारख्या कर्जांची पुनर्रचना करून थकबाकीदार होण्याचा धोका टाळता येईल. मार्च २०२० च्या पूर्वीपर्यंत ज्यांचा कर्जफेडीचा हप्ता थकलेला नाही अशांनाच ही सुविधा मिळेल. दरम्यान, कर्जवसुलीत दिलासा म्हणून ५ महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या मोरटोरियमला मुदतवाढ देण्यात आलेली नाही. रिझर्व्ह बँकेने कर्ज आणि सोन्याच्या किमतीचे प्रमाण (एलटीव्ही) ७५ टक्क्यांवरून वाढवून ९० टक्के केले आहे. कौटुंबिक, व्यावसायिक अडचणींवर यामुळे मात करता येईल.
Leave a Review