भारतात १ जुलै २०१७ रोजी जीएसटी ही करप्रणाली लागू करण्यात आली. तेव्हापासून सातत्याने जीएसटी दर कमी करण्यात आला असल्याचे सरकारने म्हटले आहे. आता केवळ लक्झरी वस्तूंसाठी २८ टक्के जीएसटी आहे. एकूण २३० वस्तूंपैकी २०० वस्तूंवरील जीएसटी कमी करण्यात आला असल्याचे अर्थ खात्याने ट्विटमध्ये म्हटले आहे. वस्तू आणि सेवा कर प्रणालीची घडी बसवण्यापासून त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी करण्यात दिवंगत अरुण जेटली यांचा मोलाचे योगदान आहे. देशातील कर प्रणालीत ऐतिहासिक सुधारणा म्हणून त्याची नोंद होईल, असे ट्विट करून अर्थ खात्याने जेटली यांना आदरांजली वाहिली आहे.
जीएसटी लागू झाल्यानंतर जीएसटी करदात्यांची संख्या दुप्पट झाली आहे. सध्या १ कोटी २४ लाख जीएसटी करदाते आहेत. संपूर्ण जीएसटी प्रक्रिया आता स्वयंचलित झाली असल्याचा दावा अर्थ खात्याने केला आहे. आतापर्यंत जीएसटी प्रणालीत ५० कोटी कर परतावे देण्यात आले. तर १३१ कोटी ई वे बिल तयार झाली असल्याचे सरकारने म्हटले आहे.







Leave a Review